कदाचित राँग नंबर असावा. त्या क्षणापासून, एक सकारात्मकता माझ्यात आली. जुनी मी काहीशी बदलले, फुलण्याचे दिवस परत आले आहेत. आहे मजा जगण्यात या.
सुखाचा शोध, सुखी माणसाचा सदरा, अशा लोककथा आपण नेहमीच ऐकतो. मी सुखी आहे, असे रोज दहा वेळा लिहा, म्हणजे तुम्ही सुखी व्हाल, असा ही सल्ला ऐकतो. मात्र, सुख हे लबाड असते. ते फसवेगिरी करीत राहते. ब-याच काळ दु:खी राहिल्यावर, मी एकदा एका क्षणी, सुखी व्हायचा निश्चय केला. कदाचित तो चुकीचा निर्णय, माझी त्या काळची, काही अंशी गरज होती. त्यानंतर, माझ्या जीवनातील ती कित्येक र्वष, त्या सुखी होण्याच्या हट्टाने स्लो पॉयझनिंगमध्ये गुदमरत होती.
तू कशी तू अशी
तू फुलात मी पानात
मन जाईच्या कळ्यात..
अशी गाणी आठवून मला नेहमीच, जुन्या खुणा शोधण्याची घाई झालेली असे.
हातात हात तिचा,
हात्तीच्याच (सहज) यावा
असा सौम्य संदेश मनात येई, मात्र विरून जाई. छोटय़ा पडद्यावरच्या, त्या खोटय़ा पडद्यात, मी उगीचच वेळ घालवत असे. फुलांनी फुलायचे, कळ्यांनी हसायचे, असे हे प्रत्येक क्षणांचे थेंब, कधी सुकून गेले कळलंच नाही. वाटायचे, घडय़ाळाचे काटे दोन असतात, कारण माणूस दोन पायांनी धावत असतो. एका अपघातानंतर माझ्यातील वेगळी ती मी जागी झाले. वाढत्या वयाबरोबर, मला संगणक शिकणे, रॅट रेसमध्ये धावणे जमणार नाही, हे मी जाणले. त्या दिवशी ताप आल्यामुळे मी घरी आजारी झोपले होते. ऑफिसची कामे, फोनवरून केली जात होती. घरच्या सर्वाना, त्यांची त्यांची कामे होती. पोटात भूक मी म्हणत होती. तापाने हात-पाय चालत नव्हते. पाठदुखी पाठ सोडत नव्हती. ऑफिसचे काम पाठी लागले होते. मी आजारपणातसुद्धा मेहनत करीत होते. मला औषधांनी ग्लानी आली होती.
Answers & Comments
कदाचित राँग नंबर असावा. त्या क्षणापासून, एक सकारात्मकता माझ्यात आली. जुनी मी काहीशी बदलले, फुलण्याचे दिवस परत आले आहेत. आहे मजा जगण्यात या.
सुखाचा शोध, सुखी माणसाचा सदरा, अशा लोककथा आपण नेहमीच ऐकतो. मी सुखी आहे, असे रोज दहा वेळा लिहा, म्हणजे तुम्ही सुखी व्हाल, असा ही सल्ला ऐकतो. मात्र, सुख हे लबाड असते. ते फसवेगिरी करीत राहते. ब-याच काळ दु:खी राहिल्यावर, मी एकदा एका क्षणी, सुखी व्हायचा निश्चय केला. कदाचित तो चुकीचा निर्णय, माझी त्या काळची, काही अंशी गरज होती. त्यानंतर, माझ्या जीवनातील ती कित्येक र्वष, त्या सुखी होण्याच्या हट्टाने स्लो पॉयझनिंगमध्ये गुदमरत होती.
तू कशी तू अशी
तू फुलात मी पानात
मन जाईच्या कळ्यात..
अशी गाणी आठवून मला नेहमीच, जुन्या खुणा शोधण्याची घाई झालेली असे.
हातात हात तिचा,
हात्तीच्याच (सहज) यावा
असा सौम्य संदेश मनात येई, मात्र विरून जाई. छोटय़ा पडद्यावरच्या, त्या खोटय़ा पडद्यात, मी उगीचच वेळ घालवत असे. फुलांनी फुलायचे, कळ्यांनी हसायचे, असे हे प्रत्येक क्षणांचे थेंब, कधी सुकून गेले कळलंच नाही. वाटायचे, घडय़ाळाचे काटे दोन असतात, कारण माणूस दोन पायांनी धावत असतो. एका अपघातानंतर माझ्यातील वेगळी ती मी जागी झाले. वाढत्या वयाबरोबर, मला संगणक शिकणे, रॅट रेसमध्ये धावणे जमणार नाही, हे मी जाणले. त्या दिवशी ताप आल्यामुळे मी घरी आजारी झोपले होते. ऑफिसची कामे, फोनवरून केली जात होती. घरच्या सर्वाना, त्यांची त्यांची कामे होती. पोटात भूक मी म्हणत होती. तापाने हात-पाय चालत नव्हते. पाठदुखी पाठ सोडत नव्हती. ऑफिसचे काम पाठी लागले होते. मी आजारपणातसुद्धा मेहनत करीत होते. मला औषधांनी ग्लानी आली होती.
☺️☺️
Bt I'm not understand this language...