मानवाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात खेळाचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडासामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यांत, ऑलिंपिक क्रीडासामन्यांना एक मानाचे स्थान आहे. या ऑलिंपिक सामन्यांचे स्वतंत्र निशाण म्हणजे, एक भलामोठा ध्वज असतो. ध्वजाच्या पांढऱ्याशुभ्र रंगावर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली असतात. ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे विशाल अंतराळ होय. जगभरातील सर्व राष्ट्रांतील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. देशादेशांतील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात.
या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नेमलेली असते. या स्पर्धांत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. या सामन्यांसाठी लागणारा सारा पैसा स्पर्धक देश उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. ऑलिंपिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.
Answers & Comments
Verified answer
उत्तरः
मानवाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात खेळाचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडासामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यांत, ऑलिंपिक क्रीडासामन्यांना एक मानाचे स्थान आहे. या ऑलिंपिक सामन्यांचे स्वतंत्र निशाण म्हणजे, एक भलामोठा ध्वज असतो. ध्वजाच्या पांढऱ्याशुभ्र रंगावर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली असतात. ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे विशाल अंतराळ होय. जगभरातील सर्व राष्ट्रांतील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. देशादेशांतील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात.
या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नेमलेली असते. या स्पर्धांत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. या सामन्यांसाठी लागणारा सारा पैसा स्पर्धक देश उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. ऑलिंपिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.